Corona third wave in Maharashtra : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने सावध केलं आहे.
राज्यात (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे पण तिसरी लाट महाभयंकर (Coronavirus Third Wave) असणार आहे, असं आरोग्य विभागानेच सांगितलं आहे. राज्यात दररोज 60 लाख प्रकरणं समोर येऊ शकतात.
आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेच कोरोनाची तिसरी लाट जेव्हा पीकवर असेल म्हणजे सर्वोच्च शिखर गाठेल तेव्हा मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रकरणं असतील.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अलर्ट केलं आहे आणि व्यापक स्तरावर तायारी करण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये मुंबईत 11 मार्चला 91,100 तर पुण्यात 19 मार्चला 1.25 लाख प्रकरणांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये इथं अनुक्रमे 1.36 लाख, 1.87 लाख प्रकरणं सापडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
मुंबईतील 1.36 लाख रुग्णांपैकी 88,823 लोकांना घरी क्वारंटाइन व्हावं लागेल तर 47,928 रुग्णांना रुग्णालयात भरती करावं लागेल. 957 रुग्णांना आईसीयू बेडसह व्हेंटिलेटरची गरज पडू शकते.
पुण्यातील 1.87 लाख रुग्णांपैकी 1.21 लाख लोकांना घरी राहावं लागू शकतं आणि 1,314 लोकांना आयसीयूबेडसह व्हेंटिलेटर लागेल.
ठाण्यात दुसऱ्या लाटेत 86,732 प्रकरणांची नोंद झाली होती, जिथं तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये 1.3 लाख केसेस असतील आणि 911 आईसीयू बेड, व्हेंटिलेटर लागतील.
नागपुरात दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये 80,000 रुग्ण होते, तिसऱ्या लाटेत अंदाजे 1,21 लाखपर्यंत जातील. ज्यासाठी 850 आईसीयू बेड और व्हेटिलेटर लागतील.
ऑक्सिजनचं म्हणाल तर मुंबईला दररोज 250 मेट्रिक, पुण्याला 270 मेट्रिक टन, ठाण्याला 187 मेट्रिक टन, नागपूरला 175 मेट्रिक टन आणि नाशिकला 114 मेट्रिक टन ऑक्सिनजची गरज भासेल.