फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
रात्री उरलेलं जेवण, एखादा पदार्थ आपण सहजपणे डब्यामध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवून देतो. मात्र हा पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून टिकवल्यामुळे तो खाण्यायोग्य राहतो का? त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेला एखादा पदार्थ किती वेळ खाण्यायोग्य राहू शकतो किंवा फ्रिजमध्ये फळं, भाज्या ठेवाव्यात की नाही? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो.
फ्रिजमध्ये शिजलेले अन्नपदार्थ ठेवताना ते उघडे ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतो त्यामुळे पदार्थ फ्रिजमध्ये स्टोअर करताना स्टिलच्या डब्ब्यात बंद करून ठेवावेत.
फ्रिजमध्ये भात 2 दिवसच ठेवावा. फ्रिजमधून भात काढल्यानंतर तो नॉर्मल तापमानावर आल्यानंतर किंवा गरम करूनच खावा.
चपाती फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर ती जास्तीत जास्त 12 ते 14 तासच टिकू शकते. यानंतर तिच्यातले पौष्टिक घटक खराब व्हायला लागतात. पौष्टिक घटकांचा नाश होतो त्यामुळे पोटदुखीसुद्धा होऊ शकते.
शिजलेली डाळ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ती जास्तीत जास्त 2 दिवस टिकू शकते. यापेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये डाळ राहिली तर अशी डाळ खाल्ल्यामुळे पोटात गॅस वाढू शकतो.
कापलेली फळं उरली असतील तर, आपण त्यांना फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण प्रत्येक फळ ठराविक काळ टिकू शकतात. त्यानंतर त्यातील पोषक घटक संपू लागतात. त्यामुळे अगदी रात्रभर फ्रिजमध्ये राहिलेलं फळ खाऊ नये.
कापलेली पपई फ्रिजमध्ये जास्तीत जास्त 8 तास राहू शकते. त्यानंतर त्यात विषाक्त पदार्थ वाढायला लागतात. 12 तासानंतर फ्रिजमध्ये ठेवलेली पपई खाल्ली तर ती आरोग्याला हानिकारक ठरते.
सफरचंद कापल्यानंतर काळं पडायला लागतं. यामध्ये ऑक्सिडेशन होत असतं त्यामुळेच वरचा भाग काळा होतो. कापलेलं सफरचंद फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर 4 तास चांगलं राहू शकतं.
सफरचंद 4 ते 6 दिवस, चेरी 7 दिवस. ब्लूबेरी, रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी 3 ते 6 आठवडे, आंबट फळं 1 ते 3 आठवडे, द्राक्षं 7 दिवस टिकतात.
कलिंगड टरबूज न कापता 2 आठवडे, कापल्यानंतर 2 ते 4 दिवस, अननस 5 ते 7 दिवस, काकडी 4 ते 6 दिवसात खावी.