पावसाळ्यात येणाऱ्या फळांमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. त्यामुळे सर्दी खोकला सारख्या व्हायरल इन्फेक्शनपासून (Viral Infection) बचाव होतो.
डाळिंबात ऍन्टीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. डाळिंब खाण्याने पचन व्यवस्था सुधारते. पोटाच्या कॅन्सरमध्ये सुज कमी करतं. कर्करोगाच्या पेशी पसरण्यापासून रोखतो.
उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरवातीला मिळणारं गडद जांभळ्या रंगाची ही फळं शरीरात साखरेची पातळी आणि मधुमेह कमी करण्यासाठी रामबाण औषध आहेत. यात कॅलरी कमी आणि लोह,फॉलेट,पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात.
लीचीमध्ये व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन बी,पोटॅशियम आणि ऍन्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात. लीची आपल्या शरीरातील एन्टीबॉडी आणि इम्युनिटी मजबूत करण्यात मदत करते. फायबर पाचक प्रणाली शुद्ध करण्यात मदत करते आणि व्हिटॅमिन सी सर्दीशी लढतं.
आलुबुखार बद्धकोष्ठतेत मदत करतं. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतं. याशिवाय आयर्न, व्हिटॅमिन-सी असतं. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. कॅन्सरपासूनही बचाव होतो.
पीचमध्ये व्हिटॅमिन-ए,बीटाकॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. पीचमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासही मदत होते.
पावसाळ्यात चेरी अगदी आरामात मिळतात. त्यामध्ये मेलाटोनिन आणि ऍन्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या शरीराच्या पेशीचं फ्री-रॅडिकल्सपासून होणारं नुकसान टळतं.
नासपती पावसाळ्यात होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करतं . यात व्हिटॅमीन्स मोठ्या प्रमाणात असतात. पावसाळ्यात आजारपण येण्याची शक्यता असते त्यामुळे नासपती खावेत.