Avoid Reheating These Foods : एक काळ असा होता की घरात सगळे एकत्र बसून गरमागरम जेवण करायचे, आता परिस्थिती बदलली आहे. आता, अनेकांना आपल्या मोकळ्या वेळेनुसार, आधी शिजवलेले अन्न गरम करून खाण्याची सवय लावली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, एकदा बनवलेले अन्न पदार्थ पुन्हा गरम करून खाणे नकळत शरीराला हानीकारक ठरते.
मांसाहारी अन्न - चिकन, मांस आणि अंडी यांसारखे मांसाहार प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. पण हे मांसाहारी पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ले तर अन्नातून विषबाधा आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फक्त ताजे मांसाहार खाणे चांगले. उच्च प्रथिनयुक्त अन्नामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, अशा परिस्थितीत ते पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचते.
तांदूळ – अनेक घरांमध्ये असे घडते की, रात्री उरलेला भात दुसऱ्या दिवशी सकाळी तेलात फ्राय करून खाल्ला जातो. परंतु असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तांदूळ पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये अन्नातून विषबाधा करणारे जीवाणू मोठ्या प्रमाणात तयार होतात, जे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.
बटाटा - बटाटा हा प्रत्येक घरात विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. बटाट्याची भाजी किंवा बटाट्यापासून बनवलेला कोणताही खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नये. बटाटे पुन्हा गरम केल्याने व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे त्याताली पोषक घटक नष्ट होतात.
मशरूम - मशरूमचे खाद्यपदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खाऊ नयेत. मशरूम हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत. त्यामध्ये खनिजे देखील आढळतात. परंतु मशरूम पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिने निघून जातात आणि विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचते.
नायट्रेटयुक्त आहार – पालक, हिरव्या पालेभाज्या, गाजर, सलगम, बीट इत्यादी नायट्रेटयुक्त अन्न शिजवल्यानंतर पुन्हा गरम करू नये. यामुळे, त्यांच्यामध्ये नायट्रेट्स आणि नंतर नायट्रोजनेस तयार होतात जे आपल्या शरीराच्या ऊतींना हानिकारक असतात.