नव-याच्या ‘या’ अटीमुळे अभिनेत्रीनं तोडलं लग्न
कुंडली भाग्य या मालिकेमुळं प्रकाशझोतात आलेली श्रद्धा आर्या ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
गेले पाच वर्ष ती व्यवसायिक जयंत रत्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र त्याच्या एका अटीमुळं तिनं हे लग्न मोडलं आहे.
श्रद्धानं अलिकडेच राजीव खंडेलवालच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं आपल्या करिअरवर भाष्य करताना जयंतसोबतच्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला.
तिचं जयंतवर खूप प्रेम होतं. तिला त्याच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. पण त्यानं तिच्यासमोर एक अट ठेवली होती.
लग्नानंतर तिनं अभिनय करु नये. तिनं गृहीणी बनून केवळ घर सांभाळावं अशी त्याची इच्छा होती. अन् त्याची ही अट श्रद्धाच्या करिअरच्या आड येत होती म्हणून तिनं आपलं लग्न मोडलं.
श्रद्धाला अभिनय क्षेत्रात प्रचंड नाव कमवायचं आहे. अभिनय हेच तिचं प्रेम आहे. अन् त्यासाठी ती कोणालाही सोडू शकते असा दावा तिनं या मुलाखतीत केला होता.
लग्न मोडल्यामुळं तिच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती. अगदी नातेवाईकांसोबतच कुटुंबीयांनी देखीव तिच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. परंतु श्रद्धा आपल्या निर्णयावर ठाम होती.
साखरपुडा किंवा लग्न तुटल्यानंतर जे लोक स्वतःला दोष देण्यास सुरुवात करतात अशा लोकांना सांगू इच्छितो की नातं टिकवण्यासाठी आवडीसोबतच दोन लोकांचे विचार देखील जुळावे लागतात. असं ती टीकाकारांना म्हणाली.
श्रद्धानं आतापर्यंत ‘एन्टरटेमेंट की रात’, ‘ड्रीम गर्ल’, ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.