रात्रीस खेळ चाले : ... म्हणून लग्नानंतर छाया माहेरी परतते
Ratris Khel Chale - रात्रीस खेळ चाले मालिकेत सध्या छायाचं लग्न गाजतंय. पण एक अघटित तिच्या आयुष्यात घडणार आहे.
- -MIN READ
Last Updated :
0107
रात्रीस खेळ चाले मालिकेत रोजच बऱ्याच घटना घडत असतात. सध्या छायाचं लग्न खूप गाजतेय.
0207
छायाचं राजग्यावर प्रेम आहे, हे कळल्यावर अण्णा जबरदस्तीनं छायाचं लग्न लावून देतात. राजग्याचा जीव वाचावा म्हणून मनाविरुद्ध लग्नाला होकार देते.
0307
लग्न लागल्यानंतर अण्णा तिला सांगतात की परत घरी येऊ नकोस. तुला या घराचे दरवाजे बंद. छायाची वरात दुसऱ्या गावी जायला निघते.
0407
वऱ्हाडाच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडते. वऱ्हाडाला अपघात होतो. त्या अपघातात छायाचा नवरा मरतो.
0507
छायाची सासू छायाला म्हणते, हे सर्व तुझ्यामुळे झालं. ती छायाला तिच्या माहेरी पोचवते.
0607
आता पुढच्या भागात छायाच्या दु:खाचे दशावतार पाहायला मिळतील. त्यात अण्णांनी वकिलामार्फत राजग्यालाही गायब केलंय.
0707
आता पुढे छायाचं वेगळं रूप पाहता येणार आहे. चिडलेली, दुखावलेली छाया अण्णांना जाब विचारते.
- First Published :