गेले काही महिने दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अखेर या बातम्या खऱ्या निघाल्या.
आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला.
परंतु गेले काही महिने दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अखेर या बातम्या खऱ्या निघाल्या.
आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
लक्षवेधी बाब म्हणजे आमिर आणि किरणचा घटस्फोट होणार ही बातमी समोर येताच काही नेटकऱ्यांनी अभिनेत्री फातिमा सना शेख हिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. अर्थात यामुळेच किरणनं आमिरला घटस्फोट दिला असा कयास काही नेटकरी बांधत आहेत. शिवाय फतिमाला आमिर खानच्या घटस्फोटामुळं ट्रोल देखील केलं जात आहे.
“या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे.” असं स्टेटमेंट त्यांनी जारी केलं आहे.
किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं.