होळी म्हटलं की, बॉलिवूडमध्ये आजही RK Holi ची आठवण काढतं. राज कपूर यांची आठवण आल्याशिवाय हा सण पूर्ण होऊ शकत नाही. अमिताभ बच्चन यांनी एकदा राज कपूर यांच्या होळीच्या वेळी किस्सा केला होता.
सध्या सर्वत्र होळी साजरी केली जात आहे. तर बऱ्याच ठिकाणी रंगपंचमीसुद्धा साजरी होतं आहे. कोरोनाचं सावट असल्यानं याला बऱ्याच नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. अशातच लोकं धूमधडाक्यात साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या आठवणीत रमत आहेत. रंगपंचमी म्हटलं की राज कपूर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
बॉलीवूड मधील ज्येष्ठ अभिनेता राज कपूर यांची रंगपंचमी खूपच प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज कपूर यांनी सुरु केलेली ही प्रथा पुढे राज कपूर यांनी मोठ्या उत्साहाने जपली.
राज कपूर यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांना आमंत्रित करत असतं. यावेळी नवनवीन कलाकारांना आपल्या अंगातील कलाकौशल्ये दाखविण्यास वाव मिळत असे.
या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला, तो म्हणजे बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी. या काळात अभिताभ यांचे तब्बल 9 चित्रपट अपयशी ठरले होते.
अशातच राज कपूर यांनी रंगपंचमी साठी अमिताभ यांनाही आमंत्रित केलं होतं. आणि त्यांनी अमिताभला म्हटलं, आज असं काही कर की सर्व लोक तुझावर प्रभावित व्हायला हवेत. बघ इथे किती लोक उपस्थित आहेत.
त्यांनतर इतर कलाकारांप्रमाने अमिताभ यांनी आपलं कौशल्य दाखवत 'रंग बरसे' हे गाणं म्हटलं होतं. त्यांनी आपल्या कलागुणांनी इतकं चांगलं वातावरण निर्माण केलं होतं की तिथं उपस्थित सर्व लोकं त्यांच्यावर प्रभावित झाले होते.
या कार्यक्रमामध्ये राज कपूर स्वतः खूपचं उत्साहाने सहभागी होतं असतं. आणि इतरांनाही सहभागी करून घेतं असत.
यावेळी वेगवेगळ्या वाद्यांच्या तालावर गाण्याच्या मैफिलीसुद्धा रंगत असतं. बॉलीवूडचे कलाकार वर्षभर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतं.
या रंगपंचमीमध्ये नर्गिस, वैजंतीमाला, हेमा मालिनी, राकेश रोशन, मिथुन, धर्मेंद्र,जितेंद्र, प्राण, प्रेम चोप्रा, रेखा, अनिल कपूर, दारासिंग, शत्रुघ्न सिन्हा यांसारखे मोठ-मोठे कलाकार मोठ्या उत्साहाने सहभागी होतं असतं.
त्याचबरोबर शम्मी कपूर, रणधीर कपूर, राज कपूर, ऋषी कपूर या सर्वच कपूर कुटुंबाचं एकमेकांवर असणारं प्रेम सुद्धा बघायला मिळत असे.