सिनेमाच्या ऑडिशनसाठी मला एका अनोळखी व्यक्तीसोबत इंटिमेट सीन करायला सांगण्यात आलं होतं अशी खंत या अभिनेत्रीनं व्यक्त केली आहे.
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी अनेक अभिनेत्रींना बरंच स्ट्रगल करावं लागतं. अनेकदा सिनेमांच्या ऑडिशनच्या वेळी त्यांना वाईट अनुभवांनाही सामोर जावं लागतं. पण याबाद्दल पूर्वी फारसं न बोलणाऱ्या अभिनेत्री आता मात्र बोलू लागल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीला करिअरच्या सुरुवातीला अनेक वाईट अनुभवांना सामोरं जावं होतं. तिने यातलेच काही अनुभव आता शेअर केले आहेत. 1011मध्ये आलेल्या ये साली जिंदगी सिनेमातून अदितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
या सिनेमासाठी ऑडिशन देताना तिला एका वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. या सिनेमाच्या ऑडिशनसाठी तिला एका अनोळखी व्यक्तीसोबत इंटिमेट सीन करायला सांगितला होता.
एका ओटीटी प्लॅटफॉर्मच्या टॉक शो दरम्यान अदितीने आपला हा अनुभव शेअर केला. ‘ये साली जिंदगी सिनेमाच्या ऑडिशनसाठी मला एका अनोळखी व्यक्तीसोबत इंटिमेट सीन करायला सांगण्यात आलं.’ अदिती इथे अभिनेता अरुणोदय सिंहबद्दल सांगत होती. या सिनेमात तिच्यासोबत अरुणोदयची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
अदिती म्हणाली की, ‘त्यावेळी मी त्याला ओळखत नव्हते. तो एवढा उंच आणि धिप्पाड होता की माझ्या मनात एकच प्रश्न आला तो म्हणजे इथे नक्की चाललंय काय?’ या सगळ्यात अरुणोदय फार विनम्रतेने माझ्याशी वागत होता.
या टॉक शोमध्ये अदितीने आपल्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी शेअर केल्या. वयाच्य 21 व्या वर्षी अदितीचं अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न झालं होतं. पण अगदी थोड्याच काळात दोघं वेगळी झाली. याबद्दल बोलताना अदिती म्हणाली की, ‘वयाच्या 21 व्या वर्षी जर तुम्ही अशा नात्यात आला असाल तर तुमचा डेटिंग स्कोअर शुन्यच असेल ना... डेट कसं करतात हे मला माहीत नाही बहुधा...’
यावेळी अदितीने तिला सिनेमांचं वेड कसं लागलं याबद्दलही सांगितलं. मणिरत्नम यांच्या बॉम्बे सिनेमामुळे तिला सिनेमांचं वेड लागलं. त्यातही या सिनेमातील कहना ही क्या या गाण्याची ती आजही वेडी आहे.