फोनची बॅटरी १०० टक्के चार्ज म्हणजे धोक्याची घंटा?

कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या ती कालांतराने स्लो होते किंवा आधी आहे तशीच ती नसते.

अनेक लोक फोनला सतत चार्जिंगला लावतात किंवा थोडी बॅटरी उतरली तरी चार्ज करतात. 

पण हा प्रकार फोनसाठी आणि त्याच्या बॅटरीसाठी धोकादायक आहे.

सामान्यतः, आधुनिक फोनची बॅटरी लिथियम-आयनची असते, तिचे आयुष्य 2-3 वर्षे असते.

ही बॅटरी बनवणारे लोक सांगतात की अंदाजे 300-500 वेळा चार्ज होऊ शकते, त्यानंतर बॅटरीची क्षमता 20% कमी होते.

मग जेव्हा तुम्ही सतत फोन चार्ज करता तेव्हा बॅटरीची चार्जींग सायकल लवकर कमी होते. ज्याचा परिणाम बॅट्रीवर होतो.

आता प्रश्न असा आहे की फोनच्या बॅटरीची टक्केवारी किती उरली की ती चार्जिंगवर ठेवली पाहिजे?

चांगल्या बॅटरी लाइफसाठी, तुमचा फोन कधीही 20 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के असते, तेव्हा ते पाहून खूप बरं वाटू शकतं, पण बॅटरीसाठी ते चांगले नाही.

लिथियम-आयन बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ती गरम होऊ लागते, जे चांगले नाही.

तसेच बॅटरी चार्ज करण्यासाठी फोन पूर्णपणे 0% पर्यंत संपण्याची प्रतीक्षा करू नका.