भारतात फार पूर्वीपासून पाळीव प्राणी म्हणून श्वान पाळले जातात.
अलीकडे परदेशी जातींचे श्वानही लोक सांभाळत आहेत.
काही भारतीय जातीच्या श्वानांनाही परदेशात मोठी मागणी आहे.
लातूर जिल्ह्यातील एक गाव श्वानांसाठी प्रसिद्ध आहे.
जानवळ येथील पश्मी आणि कारवान जातीच्या श्वानांना मोठी मागणी आहे.
पश्मी जातीच्या श्वानांवरून गावाला जानवळ पश्मी या नावानेच ओळखले जााते.
कारवान ही जात शिकारीसाठी म्हणून ओळखली जाते.
पश्मी जातीचे श्वान रााखणदारीसाठी प्रसिद्ध आहेत.
जानवळ येथे शेतीसोबत जोदधंदा म्हणून श्वान पालन केले जाते.
श्वानांची जिल्ह्यात 10 ते 15 तर जिल्ह्याबाहेर 20 हजारांना विक्री होते.
सध्या परदेशात श्वानांच्या विक्रीवर बंदी असल्याने श्वान पालक अडचणीत आहेत.