महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात स्वदेशीचा पुरस्कार केला.
चरख्यावर सूत कातून खादीचे कापड बनवणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला.
महात्मा गांधींनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातही हा कार्यक्रम सुरू केला.
स्वावलंबी जीवनासाठी हाताला काम स्वदेशी कापड निर्मितीचा उद्देश आहे.
सेवाग्राममध्ये हा कार्यक्रम सुरूच असून कापसापासून कापड बनवले जाते.
उमेश ताकसांडे हे गांधींचा वैचारिक वारसा जपत आहेत.
सेवाग्राममध्ये कापूस ते कापड विभाग कार्यरत आहे.
या विभागात चरख्यावर सूत कातले जाते.
सूतापासून खादीचे कापड बनवले जाते.
या विभागामार्फत 50 ते 60 जणांना रोजगार निर्माण करून दिला आहे.
सेवाग्राममध्ये खादीचे स्वदेशी बनावटीचे कापड तयार केले जाते.
कापडाची विक्री देखील सेवाग्राम आश्रमातच केली जाते.
सेवाग्राममध्ये येणारे परदेशी पाहुणेही हे कापड खरेदी करतात.
देशातून आणि परदेशातूनही या कापडाला पसंती मिळते.