महाराष्ट्राला मोठं निसर्गाचं वैभव लाभलं असून पावसाळा सुरू झाला की लोक आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक पर्यटन स्थळे म्हणून अकोले तालुक्याची ओळख आहे.
सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले तुडूंब वाहत आहेत.
अकोले तालुक्यातील अनेक धरणे ओव्हर फ्लो झाले असून पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
अकोले शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात कुमशेत हे गाव आहे.
डोंगरांवर धुक्याची चादर पसरली असून येथील डोंगर दऱ्यांनी हिरवी चादर पांघरल्यासारखा नजारा दिसतोय.
पावसाळा सुरू होताच कुमशेत परिसरात मोठ्या संख्येने लोक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.
पर्यटकांना राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था राजुर, शेंडी, भंडारदरा व अकोले या गावांमधील हॉटेलमध्ये उपलब्ध आहे.
या परिसरातील नयनरम्य दृश्ये पाहिल्यानंतर इथं येण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही.
अकोले तालुक्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार ऋतिक चासकर यांनी येथील निसर्ग सौंदर्य टिपलं आहे.
कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती
Click Here