कोचिंग नव्हे तर Self Study ने UPSC मध्ये मारली बाजी, 26 वर्षांच्या तरुणाची कमाल
राजस्थानच्या कोटा येथील 26 वर्षीय वीरेंद्र कुमार मीना यांनी UPSC मध्ये बाजी मारली.
विशेष म्हणजे वीरेंद्रला हे यश सेल्फ स्टडी करुन मिळाले.
चौथ्या प्रयत्नात वीरेंद्रने यशस्वीपणे बाजी मारली.
वीरेंद्रने ऑल इंडिया 883 वी रँक मिळवली आहे.
वीरेंद्र यूपीएससी उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला
यूपीएससीमध्ये यश मिळवण्यावर वीरेंद्र म्हणाला की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे कठोर परिश्रम, विश्वास आणि जिद्द असायला हवी.
. हिंमत, धाडस आणि मेहनत घेऊन तयारी केली तर प्रत्येक परिस्थितीत यश मिळते. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मनात फक्त हिंमत असली पाहिजे.
वीरेंद्रने सांगितले की, तुम्हाला एकदाच यश मिळत नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील.
वारंवार अपयश आल्याने निराश होऊ नये. त्यापेक्षा मेहनत करायला हवी. यश कधीच एकाच वेळी येत नाही, त्यासाठी तुम्हाला अनेकवेळा अपयशाला सामोरे जावे लागते, पण माघार घेऊन तुमची स्वप्ने कधीच संपवू नका.