ओले केस विंचरावे की नाही?

चुकीची जीवनशैली आणि बाहेरचं जेवण यामुळे अनेकांना लहान वयातच केस गळणे आणि केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

केस गळण्यावर प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. पण त्यांपैकी एक म्हणजे चुकीच्या पद्धतीने केस विंचरण्याची सवय. 

तज्ज्ञांच्या मते, आंघोळीनंतर लगेच ओल्या केसांना विंचरणे किंवा फणी फिरवणे योग्य नाही.

असे केल्याने केसांची मुळं कमकुवत होतात, त्यामुळे केस तुटायला आणि गळायला लागतात.

म्हणून आपण केस कोरडे होण्याची वाट पाहावी, त्यानंतरच त्यांना विंचरावं

केस ओले असतानाच फणी फिरवली तर मुळांवर अनावश्यक ताण निर्माण होतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि गळू लागतात.

कंगवा करण्याची योग्य पद्धत काय?आंघोळीनंतर पाण्यामुळे केस एकत्र चिकटतात, अशावेळी दात जाड असलेला कंगवा वापरावा.

केसांची लांबी कितीही असो, पण कंगवा पूर्णपणे खाली नेण्याऐवजी हळूहळू अर्ध्या लेवलपर्यंत केस विंचरा. 

2 भागांमध्ये केस करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्यांना विंचरण्यास सुरुवात करा. असे केल्याने केस लवकर तुटत नाहीत.

तुम्ही दिवसातून किती वेळा कंगवा करता?
दिवसातून 2-3 वेळा कंगवा करणे आवश्यक आहे. असे केल्याने ते मजबूत राहतात.