उर्फी जावेद हे नाव आता कोणालाच नवीन राहिलेलं नाही.
तिच्या ड्रेसिंग आणि फॅशनमुळे तिने चाहत्यांना वेड लावलं असलं तरी तिच्या नावाने राजकारण मात्र चांगलंच तापत आहे.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे.
मात्र आपल्या अंतरंगी फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
एक काळ असा होता जेव्हा उर्फी जावेद नैराश्यात गेली होती आणि याचं कारण तिचे वडील होते.
उर्फी तिच्या वडिलांना फार घाबरायची आणि त्याच भीतीने ती घरातून पळून आली.
उर्फीने एका मुलाखतीत सांगितलं होतं कि तिच्या वडिलांनी २ वर्ष तिचा मानसिक छळ केला.
त्यामुळेच ती नैराश्यात होती आणि स्वतःच नाव देखील विसरून बसली होती.
आता मात्र उर्फी घरापासून दूर येऊन आयुष्यात चांगलीच आनंदी आहे.