कोश्यारींच्या 'हुशारी'वर कोर्ट संतापलं, कारण?
"महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत राज्य. मात्र, अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागतो"
राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे हे सरकार पाडण्याचं पाऊल होत असे दिसून येत आहे
सरकार पडेल, अशी कोणतीही कृती राज्यपालांनी करायला नको होती.
"आमदारांच्या जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणे अयोग्य"
अधिवेशन पुढे असतानाही राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली.
आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी राज्यपालांना केवळ सुरक्षेसंदर्भात पत्र पाठवणे पुरेसे होते.
अशा पद्धतीने विश्वास मत मागणे लोकशाहीसाठी घातक आहे.
राज्यपालांनी राजकारणात उतरणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे.
राज्यपालांना अशी कोणती गोष्ट दिसली? बंडखोर आमदारांचे पत्र हे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत नव्हते. तरीही राज्यपालांनी तसे गृहीत धरले