30 ऑगस्ट, भोपाळ : एकीकडे देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक राज्यांना पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे लोकांच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मध्य प्रदेशात पावसाचा कहर सुरू आहे. येथील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरामुळे राज्यातील 9 जिल्ह्यातील 394 हून जास्त गावांवर संकट ओढवलं आहे.
त्यानंतर आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूरपरिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली. येथीन वैनगंगा नदीतून पाणी गावांमध्ये शिरले, त्यातून या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
#WATCH Madhya Pradesh: Indian Air Force launched a Mi17V5 helicopter mission to rescue 2 youth & an elderly man from their inundated houses near Mowad village in Balaghat, situated along the banks of the overflowing Wainganga river.
आज पांच जिलों का हवाई सर्वे किया है- देवास, हंडिया, होशंगाबाद, सीहोर, रायसेन। नर्मदा नदी का पानी समुद्र की तरह दिख रहा है। अभी भी गांव के गांव पानी में डूबे हुए हैं। राहत की बात ये है कि पानी एक डेढ़ फीट अभी कम हुआ है। लोगों को राहत शिविरों में ले जाया जा रहा है: म.प्र. CM https://t.co/jivQD9MAJipic.twitter.com/LFTLAwkYUH
आतापर्यंत 7000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. छिंदवाड्यातील पूरात अडकलेल्या 5 लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आलं. होशंगाबाद, सीहोर आणि रायसेन जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. येथे बचावकार्यासाठी वायुसेनेचे जवान आले आहेत. अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.