महाराष्ट्रात देखील डौलात उभं राहिलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत. हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटामुळे पाण्यात गेल्याचं दु:ख आहे. तेलंगणा राज्यात पूरस्थिती आल्यानंतर सरकारने पीडित कुटुंबांना 10 हजार रुपयांची रोख मदत देण्याचे जाहीर केलं होतं. गेल्या आठवड्यात आलेल्या या आपत्तीनंतर हैदराबाद शहरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेश सरकारने मंगळवारी सांगितले की, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला. तेलंगणाचे स्थानिक संस्था प्रशासन मंत्री के. टी. रामराव आणि इतर मंत्री व आमदारांनी शहरातील विविध भागातील पीडित कुटुंबांना 10-10 हजार रुपये दिले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल ही मदत योजना जाहीर केली.#HyderabadRains #Hyderabad #HyderabadFloods These Fishs Came In People Homes Oh My God #prayforhyderabad pic.twitter.com/pWbZvWSJrh
— Nilesh (@Nilesh75885116) October 14, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hyderabad