मराठी बातम्या /बातम्या /Viral /हा पोलीस अधिकारी आहे रिअल 'बजरंगी भाईजान', सिनेमात नव्हे खरी घडली ही घटना

हा पोलीस अधिकारी आहे रिअल 'बजरंगी भाईजान', सिनेमात नव्हे खरी घडली ही घटना

हा पोलीस अधिकारी आहे रिअल 'बजरंगी भाईजान', सिनेमात नव्हे खरी घडली ही घटना

हा पोलीस अधिकारी आहे रिअल 'बजरंगी भाईजान', सिनेमात नव्हे खरी घडली ही घटना

सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट तुम्ही पहिला असेल या चित्रपटात सलमान एका हरवलेल्या मुलीला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतो. असेच काहीसे कार्य हरियाणातील एएसआय राजेश कुमार देखील करत आहे. राजेश कुमार यांनी आतापर्यंत ७०० हुन अधिक मूळ आणि वृद्धांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले आहे.

पुढे वाचा ...

पंचकूला, 26 मे : हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचा हरियाणा पोलिसांचा उपक्रम आता यशस्वी होऊ लागला आहे. हरियाणा पोलिसांची मानव तस्करी विरोधी टीमने ताटातूट झालेल्या शेकडो मुलांना आणि वृद्धांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. हरियाणा पोलिसात कार्यरत असलेले एएसआय राजेश कुमार या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावत असून आता त्यांना 'बजरंगी भाईजान' या नावाने देखील ओळखले जाऊ लागले आहे.

एएसआय राजेश कुमार यांनी राजस्थानमधून 10 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका मुलाची केस हाताळली होती. राजेश कुमार यांनी बेपत्ता मुलांच्या शोधात बालगृह राजपुरा जिल्हा पटियाला पंजाब येथील कल्याण अधिकाऱ्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच कल्याण अधिकारी म्हणाले की, हरियाणाचा त्यांच्याकडे एकही मुलगा नाही, पण येथे एक मुलगा आहे ज्याच्या कुटुंबाला शोधण्यात अद्याप यश आले नाही. त्याची विचारपूस केली होती तेव्हा त्याने तो बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच संबंधित मुलाने त्याचा नाव आणि पत्ता देखील सांगितला होता पण त्याच्याने दिलेल्या पत्यावर संपर्क केला असता त्यांनी हा  मुलगा त्यांचा नसून त्यांना तो ट्रेनमध्ये सापडल्याचे सांगितले होते.

मुलाचे पुन्हा एकदा समुपदेशन करण्यात आले, तेव्हा त्याच्या तोंडून 'दरघर' हा शब्द आला. तेव्हा नेटवर हा शब्द सर्च केल्यावर 6 गावांची माहिती मिळाली.  हरियाणा पोलिसांनी सर्व राज्यांमध्ये संपर्क साधला असता, “दलघर” जिल्हा सिरोही, राजस्थानची माहिती मिळाली आणि मुलाचा फोटो तिथल्या गावात पाठवण्यात आला. तो फोटो पाहून मुलाच्या वडिलांनी हा आपला मुलगा असल्याचे ओळखले. मुलाचा फोटो वडिलांना पाठवण्यासोबतच व्हिडिओ कॉलिंगही करण्यात आले.

मुलाचे वडील शंकर लाल यांनी सांगितले की, माझा मुलगा 10 वर्षांपूर्वी 2013 मध्ये गावातून बेपत्ता झाला होता आणि त्यावेळी तो फक्त 6 वर्षांचा होता. मुलाच्या जन्मानंतर त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. CWC अमृतसरच्या आदेशानुसार, मुलाचे सर्व पेपर पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

कालका येथील चार बेपत्ता मुलांनाही कुटुंबापर्यंत पोहोचवले :

राज्य गुन्हे शाखेच्या पंचकुलाच्या पथकाने कालका येथून हरवलेली मुले शोधून काढली आहेत. यात 10 वर्षांखालील 2 मुल आणि 2 मुलींचा समावेश होता जे कालका रेल्वे स्थानकातून बेपत्ता झाले होते. ही चारही मुलं स्टेशनवरून थेट बिकानेरला पोहोचली. तेव्हा चाइल्ड हेल्पलाइनने चार मुलांची चौकशी करून त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान ही मुले वारंवार कालका म्हणत होती, त्या आधारे पोलिसांनी मुलांचे नातेवाईक शोधून काढले.

700 कुटुंबांसाठी मसिहा बनवला :

एएसआय ब्रिजेश कुमार यांनी आतापर्यंत 700 हून अधिक बेपत्ता वृद्धांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली आहे. एसआय राजेश कुमार यांना बजरंगी भाईजान म्हणूनही ओळखले जाते. SI राजेश कुमार यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे आज 700 हून अधिक बेपत्ता मुले आणि वृद्ध त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचले आहेत.

First published:
top videos

    Tags: Local18, Viral, Viral news