मराठी बातम्या /बातम्या /विदेश /34 दिवसांपासून सुरु असलेल्या Russia-Ukraine युद्धाचा भारत करणार The End, दिल्लीत निघेल फॉर्म्यूला

34 दिवसांपासून सुरु असलेल्या Russia-Ukraine युद्धाचा भारत करणार The End, दिल्लीत निघेल फॉर्म्यूला

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine war) 34 दिवस उलटले तरी हे युद्ध संपण्याचं चिन्हं दिसत नाहीत.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine war) 34 दिवस उलटले तरी हे युद्ध संपण्याचं चिन्हं दिसत नाहीत.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine war) 34 दिवस उलटले तरी हे युद्ध संपण्याचं चिन्हं दिसत नाहीत.

नवी दिल्ली, 29 मार्च: रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine war) 34 दिवस उलटले तरी हे युद्ध संपण्याचं चिन्हं दिसत नाहीत. युक्रेनमधील (Ukraine) अनेक शहरं या लढाईत उद्ध्वस्त झाली आहेत. तर रशियालाही फटका बसला आहे. अशा स्थितीत, रशियाच्या विरोधात लढा देणारे आणि युक्रेनला शस्त्रसंधी देणार्‍या अनेक देशांनाही भारताच्या त्या युक्तिवादांचे महत्त्व कळू लागलं आहे. ज्यांनी चर्चेतूनच समस्येचे निराकरण होईल, यावर भर दिला जात आहे. त्यामुळे युद्धसंकट संपवण्याचा फॉर्म्युला शोधण्यासाठी दिल्लीतील महत्त्वाच्या राजनैतिक भेटी आणि बैठकांची प्रक्रिया तीव्र झाली आहे.

त्यामुळेच क्वॉड देशांच्या नेत्यांच्या चर्चेपासून ते रशियाचे परराष्ट्रमंत्रीही भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करणारे इस्रायलचे पंतप्रधान नेफताली बेनेट यांनीही 2 एप्रिलला भारत दौऱ्यावर जाण्याची तयारी केली होती. मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांचा दौरा सध्या स्थगित करण्यात आला आहे. मात्र तो बरा होताच लवकरच भारतात येण्याचे संकेत मिळत आहेत.

यापूर्वी भारतात आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी रशियाला रोखण्यासाठी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची समजूत घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे खुलेआम आवाहन केलं होतं.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही पंतप्रधान मोदींसोबतच्या शिखर परिषदेत युक्रेनच्या संकटावर चर्चा केली. रशियाविरुद्ध निर्बंध जाहीर करणार्‍या ऑस्ट्रेलियानं भारताच्या रशियासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व समजून घेतल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा हवाला देत आतील अनेक देशांनी भारताला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युद्धविरामासाठी राजी करण्याचं आवाहन केलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनैतिक चर्चेत भारताने अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशांना सांगितलं आहे की, रशियासोबत संवादाचे मार्ग खुले ठेवणे आवश्यक आहे. यापूर्वी भारतात आलेल्या व्हिक्टोरिया नुलँड या अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेतही हे स्पष्ट करण्यात आलं होतं.

पीएम मोदींनी झेलेन्स्की आणि पुतीन यांच्याशी दोनदा चर्चा

गेल्या एका महिन्यात पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दोनदा फोनवर बोलले आहे. त्याचबरोबर भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणत्याही एका देशाविरुद्ध निर्बंध किंवा शस्त्रास्त्रांऐवजी मुत्सद्देगिरी आणि शांततापूर्ण संवादातून तोडगा काढला पाहिजे यावर भर दिला आहे.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुट्रेस यांनी शांतता प्रयत्‍नांमध्‍ये भारताची महत्‍त्‍वाच्‍या भूमिकेची कबुली देताना सांगितलं की, मी युद्धाचे संकट संपवण्‍यासाठी सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांवर लक्ष ठेवून आहे. यासाठी मी भारत, तुर्कीस्तान, कतार, इस्त्रायल या मित्र राष्ट्रांच्या संपर्कात आहे.

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री भारतात येत आहेत

युक्रेनला NLAW सारखी अँटी-टँक शस्त्रे देणाऱ्या ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री एलिझाबेथ ट्रस 31 मार्च रोजी दिल्लीत येत आहेत, यावरूनही भारताचे महत्त्व समजू शकते. त्यांचा हा दौरा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भारत दौऱ्यापूर्वी होणार आहे. लावरोव यांच्या दौऱ्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र 30-31 मार्च रोजी चीनमध्ये अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर होणाऱ्या बैठकीनंतर रशियाचे परराष्ट्र मंत्री भारतात येणार असल्याचे संकेत आहेत.

अमेरिका-रशियासाठी भारत हा महत्त्वाचा भागीदार

तज्ज्ञांच्या मते, भारत केवळ आपले वजन राखत नाही, तर अमेरिका आणि रशिया या दोघांसाठीही त्याची भूमिका महत्त्वाची आहे. जिथे भारत हा आपल्या इंडो-पॅसिफिक धोरणाचा आधार असल्याचं अमेरिकेनं अनेकदा मान्य केलं आहे. त्याचवेळी रशिया भारतासारख्या जुन्या आणि महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदार राष्ट्राशी असलेल्या संबंधांनाही महत्त्व देतो.

युक्रेनसोबतच्या युद्धाच्या वेळीही खार्किव आणि सुमी येथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेची बाब समोर आली तेव्हा रशियाने आपल्या बोलगोरोड सीमेवर बसेसची व्यवस्था केली होती. मात्र, सीमेवर पोहोचण्यात अडचणी येत असल्याने भारताने नंतर रशियाऐवजी युक्रेनच्या पश्चिम सीमेवरून आपल्या विद्यार्थ्यांना नेले.

First published:
top videos

    Tags: Narendra modi, Russia Ukraine