13 मार्च : भाजप नेते सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरुन यूटर्न घेतला आहे. माढ्यातून लढणार असं केव्हा म्हणालो? अशा शब्दात सुभाष देशमुखांनी घुमजाव केलं आहे. शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनंही देशमुखांच्या निर्णयापासून माघार घेतल्याचं दिसतं आहे. तर राष्ट्रवादीकडून नेमका कोण उमेदवार रिंगणात असेल हे स्पष्ट झालेलं नाही.