कोल्हापूर, 01 जुलै : कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. धरणामधून 7 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.