मुंबईच्या इतिहासात रक्तानं लिहिलेल्या 26/11 या तारखेला सोमवारी 10 वर्षं पूर्ण होताहेत. या घटनेचे साक्षीदार अजूनही त्याच्या खोल जखमा घेऊन जगताहेत. शरिराच्या जखमा एक वेळ १० वर्षांत भरून येतील, पण मानसिक व्रण मात्र आयुष्यभर कायम असतात. डोंबिवलीत राहणाऱ्या पारसनाथ गिरी यांनी त्यांची भळभळती जखम न्यूज18 लोकमकबरोबर शेअर केली.