लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंझावाती प्रचार केला. गेल्या काही महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या राज्यांत 200 कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांचा हा प्रचार पाहिला तर मोदींनी 125 दिवसांत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत पिंजून काढला आणि ते जवळजवळ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचले.