गुजरातमध्ये विरोधकांनी विकासाची चेष्टा केली. आणि जातीयवादाचं विष पेरण्याचा प्रयत्न केला पण गुजराती जनतेनं मतपेटीतून पुन्हा विकासालाच निवडून दिलं, ही खूप मोठी घटना आहे. गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजप सत्तेवर येणं ही माझ्यासाठी असामान्य घटना आहे. मी गुजराती जनतेचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी गुजराती मतदारांचे आभार मानले.