भारतीय संस्कृतीत भुकेल्यांना अन्नदान करण्याचे मोठे महत्त्व आहे. समाजातील गरजू आणि काबाडकष्ट करूनही पुरेसे अन्न मिळत नसलेल्यांची प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार अन्नदान करून सेवा करणे, हे एक महत्त्वाचे कर्तव्य मानण्यात आले आहे.