परभणी जिल्ह्यातल्या या सारिका नावाच्या मुलीने ज्या पद्धतीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ही खूप गंभीर घटना आहे. एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आपल्या भविष्याच्या चिंतेने उद्विग्न होते आणि स्वत:च जीवन संपवण्याचा निर्णय घेते हे किती भयानक वास्तव आहे.