नांदेड, 20 फेब्रुवारी : लोकसभा निवडणूक जशी जवळ येतेय तसं राजकारण तापत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर सभा बुधवारी नांदेडमध्ये झाली. या सभेला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. हे सरकार दुबळ आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली.