स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर सदाभाऊंची हकालपट्टी केलीय, या कारवाईने लगेच सदाभाऊंची मंत्रिपद जाईल अशातला काही भाग नाही पण, संघटनेला 30 वर्षं दिलेल्या कार्यकर्त्याला अशा मानहानीकारक पद्धतीनं संघटनेतून बाहेर पडावं लागणं खचितच योग्य नाही. किंबहुना या संघटनात्मक निमित्ताने सदाभाऊंचं शेट्टी समर्थकांकडून झालेलं 'चारित्र्यहनन' कधीही भरून निघणारं नाहीये, त्यामुळे सदाभाऊंसमोर पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.