सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा 10 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान सहा टीममध्ये जैव सुरक्षित वातावरणात खेळवली जाणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीमना 2 जानेवारीपासून जैव सुरक्षित वातावरणात जावं लागणार आहे. मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजच्या मॅच पूर्ण झाल्यानंतर रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीबाबत निर्णय घेतला जाईल. याशिवाय सदस्यांकडून मतंही मागवली जातील. माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांनुसार बीसीसीआयला फेब्रुवारी महिन्यात आयपीएल (IPL) साठी खेळाडूंचा लिलाव करायचा आहे, म्हणून त्याआधी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी खेळवली जात आहे.Cricket is Back !!!! Watch the first over bowled in Mumbai after lock down. @tushard_96 pic.twitter.com/GrSGwOOq4u
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 21, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.