दुबई, 10 सप्टेंबर : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा सध्या युएईमध्ये आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी गेला आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या पांड्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियामध्ये (T20 World Cup Team India) निवड झाली आहे. हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस फक्त मुंबईच नाही तर टीम इंडियासाठी महत्त्वाचा असणार आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्या बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. तसंच टीममध्ये निवड झाल्यानंतरही तो बॉलिंग करू शकत नव्हता, त्यामुळे टीमचं संतुलनही खराब झालं होतं. आता मात्र हार्दिक बॉलिंगसाठीही फिट आहे.
युएईमध्ये पोहोचल्यानंतर हार्दिकने भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव (Kapil Dev) आणि क्रीडा समिक्षक अय्याझ मेमन यांच्याशी संवाद साधला. यावेळी हार्दिकने कपिल देव यांनी केलेल्या एका फोन कॉलबद्दल सांगितलं. कपिल देव यांचा फोन येणं हा माझ्या करियरमधला सर्वोत्तम क्षणांपैकी एक होता, असं हार्दिक म्हणाला. कपिल सरांचा फोन आला तेव्हा त्यांना कसं उत्तर द्यायचं, हेदेखील मला कळत नव्हतं. रोज रात्री दूध आणि हळद पिऊन झोपत जा, असा सल्ला कपिल देव यांनी दिल्याचं हार्दिक म्हणाला.
It’s one of my best moments. Thank you @therealkapildev Sir for your love and guidance. Means a lot to me. @htTweets @cricketwallah pic.twitter.com/GkA89sZiCy
— hardik pandya (@hardikpandya7) September 9, 2021
कपिल देव यांनीही हार्दिकच्या या किस्स्यावर प्रतिक्रिया दिली. 'तुझ्यासारख्या टॅलेंटेड खेळाडूला दुखापत होऊ नये, यासाठी मी तुला दूध आणि हळद घ्यायचा सल्ला दिला. यामुळे दुखापत बरी व्हायला मदत होते. मी फार कोणाला फोन करून सल्ला देत नाही. सुनिल गावसकर मला म्हणाले होते, एखाद्या क्रिकेटपटूला गरज असेल तर तो तुला फोन करेल. पण मला हार्दिकला फोन करावासा वाटला, कारण मला त्याची काळजी वाटली. तो तरुण होता. क्रिकेटबद्दल मी सांगणार नाही, कारण तो स्वत: शिकेल. शरीर योग्य असणं जास्त महत्त्वाचं आहे,' असं कपिल देव म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya