रांची, 8 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचे खेळाडू आर्मीची कॅप घालून खेळण्यासाठी मैदानात उतरले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि सुरक्षादलाला अभिवादन करण्यासाठी भारताने आर्मी कॅप घातल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
#TeamIndia will be sporting camouflage caps today as mark of tribute to the loss of lives in Pulwama terror attack and the armed forces
— BCCI (@BCCI) March 8, 2019
And to encourage countrymen to donate to the National Defence Fund for taking care of the education of the dependents of the martyrs #JaiHind pic.twitter.com/fvFxHG20vi
राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये देशवासियांनी योगदान द्यावं यासाठी भारतीय संघातील खेळाडू प्रोत्साहन देणार आहेत. रांचीत सुरू असलेल्या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने सर्व खेळाडूंना आर्मी कॅप दिली. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने आर्मी कॅप घातल्याबद्दल सांगताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ही एक खास कॅप आहे. सुरक्षादलांच्या सन्मानासाठी आम्ही ही कॅप घातली असून या सामन्याचे मानधन शहीदांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचेही त्याने सांगितले. तसेच सर्व देशवासियांनीदेखील राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन कोहलीने केले.
A look at the comm box as they sport the camouflage caps#TeamIndia #JaiHind 🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/saSmfnVJeC
— BCCI (@BCCI) March 8, 2019
महेंद्र सिंग धोनी रांचीचा असल्याने भारतीय खेळाडूंचा मुक्काम धोनीच्या घरीच होता. ऋषभ पंतने खेळाडुंच्या या मुक्कामातील एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यात कोहली, धोनी आणि संघातील इतर खेळाडुही होते.