कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 युएईमध्ये खेळवली गेली, तर आयपीएल 2021 ला भारतात सुरूवात झाली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर आयपीएलचा दुसरा राऊंड पुन्हा युएईमध्ये खेळवला गेला. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर यंदा बीसीसीआयने विमान प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मुंबई-पुण्यात आयपीएलचं आयोजन होत आहे. मुंबईच्या वानखेडे (Wankhede Stadium) आणि नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील (DY Patil Stadium) स्टेडियमवर प्रत्येकी 20-20 मॅच तर पुण्याच्या एमसीए (MCA Stadium Pune) आणि मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brebourne Stadium) प्रत्येकी 15-15 मॅच होतील. आयपीएलच्या सगळ्या 10 टीम वानखेडे आणि डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये प्रत्येकी 4-4 तर ब्रेबॉर्न आणि पुण्यात प्रत्येकी 3-3 मॅच खेळणार आहेत. आयपीएल प्ले-ऑफ आणि फायनल या 4 मॅचची ठिकाणं अजून निश्चित करण्यात आलेली नाहीत. मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मागच्या वर्षी मात्र मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2021 मध्ये टीमला प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नव्हता, यानंतर लिलावामध्ये मुंबईने टीममध्ये बरेच बदल केले. या मोसमाच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही मॅच झाली होती.Savage Rohit Sharma✌@ImRo45 ❤#MumbaiIndians @mipaltan #RohitSharma pic.twitter.com/3afzQ0pust
— Jyran (@Jyran45) March 27, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma