मुंबई, 15 मे : जेव्हा IPL 2022 ला सुरुवात झाली तेव्हा या मोसमात पदार्पण करणार्या दोन संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स इतकी चमकदार कामगिरी करतील असं क्वचितच कोणाला वाटलं असेल. कागदावर दोन्ही संघ मजबूत दिसत होते. पण, आयपीएलसारख्या स्पर्धेत, ज्याची जगातील सर्वोत्तम टी-20 लीगमध्ये गणना होते. जगातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू त्यात भाग घेतात. त्या लीगमधील चॅम्पियन संघांना पहिल्याच सत्रात पराभूत करून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून उदयास येणे ही काही छोटी कामगिरी नाही. लखनौ टीमबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. आज गुजरात टायटन्सबद्दल बोलूया. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील या संघाने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध या मोसमातील 10वा विजय नोंदवला. गुजरातचा हा 13वा सामना होता. या विजयासह गुजरात संघाचे गुणतालिकेत 20 गुण झाले आहेत.
गुजरात टायटन्स हा आयपीएलच्या या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. नवे खेळाडू, नवे प्रशिक्षक, नवे संघ व्यवस्थापन आणि नवा कर्णधार असतानाही गुजरातने असे यश संपादन केले की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. संघाच्या या यशात कर्णधार हार्दिक पंड्याचाही हात आहे. त्याआधी तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. मात्र, या मोसमापूर्वी मुंबईने त्याला सोडले. यानंतर, तो गुजरात संघाचा कर्णधार बनला आणि त्याच मोसमात त्याने ते केले, जे 2008 मध्ये त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीलाही करता आले नाही. काही महिन्यांपूर्वीच त्याने टी-20 विश्वचषक जिंकला होता.
धोनी जे करू शकला नाही ते हार्दिकने केलं
2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. मात्र, राजस्थान रॉयल्सने त्याचा पराभव केला. धोनीच्या CSK ने त्या वर्षी 14 पैकी फक्त 8 सामने जिंकले. हार्दिकने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मोसमात 10 सामने जिंकले आहेत आणि गुजरातचा लीग टप्प्यात एक सामना बाकी आहे. ही वेगळी बाब आहे, की 2008 मध्ये पंजाब किंग्जने 10 आणि जेतेपदे जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सने पहिल्या सत्रात लीग टप्प्यातील 14 पैकी 11 सामने जिंकले होते. त्यातच सेमीफायनल आणि फायनलची भर म्हणजे पहिल्या सत्रात राजस्थानने 16 पैकी 13 सामने जिंकले. गुजरातलाही राजस्थानच्या बरोबरीची संधी आहे.
'इतिहास रचला...' थॉमस कप बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक विजयाने भारतात आनंदाची लाट
प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू सामना विजेते म्हणून उदयास
गुजरात टायटन्स पदार्पणाच्या मोसमातच इतकी अप्रतिम कामगिरी कशी करू शकली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू संघासाठी मॅच विनर म्हणून उदयास आले. काही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या संघाच्या विजयात चमकला, तर काही सामन्यांमध्ये डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया या जोडीने विजयाची पटकथा लिहिली. शुभमन गिल, रिद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, राशिद खान आणि मोहम्मद शमी, हे असे खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएल 2022 च्या काही सामन्यात संघाला स्वबळावर जिंकून दिले. या मोसमात गुजरातने आतापर्यंत 10 पैकी 4 सामने असे जिंकले आहेत, जिथे विजयाची फारशी आशा नव्हती. तरीही संघ शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला आणि विजयासह सामना संपवला. कधीही हार न मानण्याच्या या भावनेने यंदाच्या मोसमात गुजरातला अजिंक्य बनवले आहे.
गुजरातचं पॉइंट टेबलमध्ये टॉप-2 स्थान निश्चित! साहाने हंगामातील तिसरं अर्धशतक झळकावलं
2008 च्या राजस्थानच्या मार्गावर गुजरात टायटन्स प्रवास
या मोसमात गुजरातने आतापर्यंत 12 गोलंदाजांचा वापर केला असून त्यापैकी 10 जणांना विकेट घेण्यात यश आलं आहे. म्हणजेच 80 टक्के गोलंदाजांनी संघासाठी विकेट घेतल्या आहे. एखाद्या संघाला एवढ्या विकेट्स मिळाल्या, तर त्याला चॅम्पियन होण्यापासून रोखता येणार नाही. शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सने पहिल्या सत्रात स्टार खेळाडूंशिवाय जेतेपद पटकावून इतिहास रचला. आता हार्दिकही त्याच मार्गावर जाताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Hardik pandya, MS Dhoni