हैदराबाद, 13 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला.
मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला.
विजयानंतर मलिंगाने आपण शेवटच्या चेंडूबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, शेवटच्या चेंडूवर एक धाव जरी निघाली तर सुपर ओव्हर होईल. मात्र, या सामन्यात संघाला विजय मिळवून द्यायचा होता यासाठी मी असा चेंडू टाकला ज्यावर विकेट मिळते.
मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी केलेल्या पोलार्डने म्हटले की, फायनलला दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांवर दबाव असतो. बुमराह आणि मलिंगाने शेवटच्या दोन षटकात जबरदस्त गोलंदाजी केली.
दरम्यान, टॉस जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलार्डच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 150 धावा केल्या. वॉटसनची खेळी व्यर्थ गेली. त्याने 59 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटच्याच षटकात तो मलिंगाच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. दरम्यान मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना ड्यु प्लेसिस बाद झाल्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडू पाठोपाठ बाद झाले झाला. रैनाला राहुल चहरनं तर, रायडूला बुमराहनं बाद केले. रैना 8 धावांवर तर, रायडू केवळ एक धाव करत बाद झाला.
मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO