मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहलीचा नवा फोन हरवला! ट्विट करत मागितली मदत

विराट कोहलीचा नवा फोन हरवला! ट्विट करत मागितली मदत

भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी नागपुरात दाखल झाला आहे. मात्र कसोटी सामन्यासाठी सराव करत असताना विराट कोहलीचा नवा कोरा फोन हरवल्याची बातमी समोर येत आहे.

भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी नागपुरात दाखल झाला आहे. मात्र कसोटी सामन्यासाठी सराव करत असताना विराट कोहलीचा नवा कोरा फोन हरवल्याची बातमी समोर येत आहे.

भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी नागपुरात दाखल झाला आहे. मात्र कसोटी सामन्यासाठी सराव करत असताना विराट कोहलीचा नवा कोरा फोन हरवल्याची बातमी समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला 9 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून याकरता भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. मात्र कसोटी सामन्यासाठी सराव करत असताना विराट कोहलीचा नवा कोरा फोन हरवल्याची बातमी समोर येत आहे.

विराट कोहलीने मंगळवारी ट्विट करून एक दुःखद बातमी शेअर केली. त्याने ट्विट करत लिहिले, "तुमचा नवीन फोन अनबॉक्स केल्याशिवाय हरवला यापेक्षा मोठं दुःख नाही. कोणी तो पाहिला आहे का?". विराटच्या या ट्विटवर चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काही चाहत्यांना हे ट्विट जाहिरातीचा भाग असल्याचे वाटते. सध्या विराटाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर अनेक मिम्स बनत आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Nagpur, Virat kohli