मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : इंग्लंडची पुन्हा घसरगुंडी, भारताला विजयासाठी हव्या फक्त एवढ्या रन

IND vs ENG : इंग्लंडची पुन्हा घसरगुंडी, भारताला विजयासाठी हव्या फक्त एवढ्या रन

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या (India vs England) बॅटिंगची घसरगुंडी पाहायला मिळाली. फक्त 81 रनवर इंग्लंडची टीम ऑल आऊट झाली. त्यामुळे भारताला विजयासाठी 49 रनची गरज आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या (India vs England) बॅटिंगची घसरगुंडी पाहायला मिळाली. फक्त 81 रनवर इंग्लंडची टीम ऑल आऊट झाली. त्यामुळे भारताला विजयासाठी 49 रनची गरज आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या (India vs England) बॅटिंगची घसरगुंडी पाहायला मिळाली. फक्त 81 रनवर इंग्लंडची टीम ऑल आऊट झाली. त्यामुळे भारताला विजयासाठी 49 रनची गरज आहे.

अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या (India vs England) बॅटिंगची घसरगुंडी पाहायला मिळाली. फक्त 81 रनवर इंग्लंडची टीम ऑल आऊट झाली. त्यामुळे भारताला विजयासाठी 49 रनची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट घेणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या, तर आर.अश्विनला (R.Ashwin) 4 विकेट मिळाल्या. वॉश्गिंटन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं. डे-नाईट टेस्टमध्ये 11 विकेट घेणारा अक्षर पटेल पहिला खेळाडू ठरला आहे, याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या नावावर हा विक्रम होता. कमिन्सने श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये 10 विकेट घेतल्या होत्या.

त्याआधी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा 145 रनवर ऑल आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवशी जो रुट (Joe Root) आणि जॅक लीच (Jack Leach) यांच्या माऱ्यापुढे भारताची इनिंग कोसळली.

अश्विनने इतिहास घडवला, हा विक्रम भारताचा पहिला तर जगातला दुसरा

इंग्लंडचा कॅप्टन जो रुट हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्यानं एकही रन न देता ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला आऊट केलं. त्यापाठोपाठ एक बाजू लावून उभ्या असलेल्या आर. अश्विनची विकेट देखील त्यानं घेतली. जो रुटनं फक्त 8 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या दिवशी 3 आऊट 99 या स्कोअरवरुन भारतानं पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्माने अहमदाबादच्या फिरत्या पिचवर 66 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुरुवातीपासून आत्मविश्वासनं खेळणाऱ्या रोहितचा लीचला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तो आऊट झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला ही टेस्ट गमावून चालणार नाही. तर इंग्लंडला ही टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे.

पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा 112 रनवर ऑल आऊट केला होता. अक्षर पटेलने 6 विकेट, अश्विनने 3 विकेट तर इशांत शर्माला एक विकेट मिळाली होती.

First published:
top videos