मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Ban: अ‍ॅडलेडच्या मैदानात टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट? पाहा बांगलादेशविरुद्ध रोहितची प्लेईंग इलेव्हन

Ind vs Ban: अ‍ॅडलेडच्या मैदानात टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट? पाहा बांगलादेशविरुद्ध रोहितची प्लेईंग इलेव्हन

अॅडलेडच्या मैदानात टीम इंडियाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

अॅडलेडच्या मैदानात टीम इंडियाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

Ind vs Ban: मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि सिडनीत नेदरलँडला हरवून भारतानं 4 पॉईंटची कमाई केली. पण गेल्या रविवारी पर्थमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अ‍ॅडलेड, 02 नोव्हेंबर: भारत आणि बांगलादेश संघात टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात महत्वाची लढत आज होणार आहे. या लढतीसाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि सिडनीत नेदरलँडला हरवून भारतानं 4 पॉईंटची कमाई केली. पण गेल्या रविवारी पर्थमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. आजचा सामना जिंकल्यास भारतीय संघाचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास कन्फर्म होईल. दरम्यान अ‍ॅडलेडच्या मैदानात बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसननं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी रोहितनं संघात केवळ एक बदल केला आहे. त्यानं दीपक हुडाऐवजी अक्षर पटेलला पुन्हा टीममध्ये स्थान दिलं आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन -  रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

 टीम इंडिया बांगलादेशवर  भारी

टी20 वर्ल़्ड कपमध्ये आतापर्यंत टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये तीन सामने झाले आहेत. त्यात तिन्ही वेळा भारतानं बाजी मारली होती. 2016 साली उभय संघात शेवटचा सामना रंगला होता. त्यात धोनीच्या टीम इंडियानं अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या त्या सामन्यात बांगलादेशला एका धावेनं हरवलं होतं. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी या दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येत आहेत.

लोकेश राहुलकडून अपेक्षा

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुलनं निराशा केली आहे. पहिल्या तीन सामन्यात त्यानं अवघ्या 22 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध लोकेश राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. काल राहुलनं नेट्समध्ये बराच वेळ सराव केला होता. यावेळी विराट कोहलीनंही त्याला मार्गदर्शन करताना दिसला होता.

हेही वाचा - Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला पाहून पुजाऱ्याची खुलली कळी; नृसिंहवाडीतील सेल्फीचा लय भारी Video

पावसाचा व्यत्यय?

अ‍ॅडलेडमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून सामन्यादरम्यान थोड्याफार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण या सामन्यात पूर्ण 20-20 ओव्हर्सचा खेळ व्हावा अशी  अपेक्षा आहे. कारण भारतीय संघासाठी हा सामना सेमी फायनलच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.

First published:

Tags: Rohit sharma, Sports, T20 cricket, T20 world cup 2022