विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचं नेतृत्व करत आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला. विराटच्या नेतृत्वात पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. विराटशिवाय मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम मैदानात उतरली होती. शमीला पहिल्या टेस्टदरम्यान दुखापत झाली होती. तर या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो बॉलिंग टाकू शकला नाही. अजिंक्य रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची ऑल राऊंड कामगिरी आणि सिराज, बुमराह तसंच अश्विनची भेदक बॉलिंग ही टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं ठरली. तसंच आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिल यानेही छाप पाडली. अजिंक्य रहाणेला त्याच्या शतकी खेळीबद्दल मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn't be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here
— Virat Kohli (@imVkohli) December 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.