नेमकं कुणाला उद्देशून केले हे ट्वीट हे ट्वीट करत त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डाला इशारा दिला आहे. कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियाने गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका पुढे ढकलली होती. तसेच, डिसेंबर २०२० मध्ये बायो बबल असतानाही कोरोना प्रकरणे सापडल्यामुळे मर्यादित षटकांची मालिका मधेच सोडून इंग्लंड संघ माघारी परतला होता. त्यामुळे हे ट्वीट या दोन देशांसाठी असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात सेंच्युरियनमधील विजयाने झाली होती, पण हा भारताचा या दौऱ्यामधील एकमेव विजय ठरला. कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेने शेवटचे दोन सामने जिंकत मालिका 2-1 ने आपल्या नावी केली. तसेच एकदिवसीय मालिकेत यजमान संघाने 3-0 ने मालिका नावावर केली. भारतीय संघ रविवारी केपटाउन येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयाच्या खूप जवळ पोहोचला होता. पण फक्त 4 धावांनी भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.Big thank you @BCCI @JayShah @SGanguly99 and the Indian players and management for the faith you showed in SA cricket’s ability to pull off a safe and successful tour. Your commitment at an uncertain time has set the example that a lot can follow.
— Graeme Smith (@GraemeSmith49) January 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, South africa, Team india