दुबई ते अबू धाबी अंतर 2 तास आहे. त्यामुळे येण्याजाण्याच्या प्रवासातच 4 तास लागले असते. त्यामुळे भारतीय टीमनं शुक्रवारचं अभ्यास सत्र रद्द केलं आणि काही खेळाडू बीच व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले. तर काही जणांनी हॉटेलमध्येच विश्रांती घेतली. आयसीसीच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेची सुरूवात यजमान BCCI आणि संयुक्त अमिरात क्रिकेट बोर्डाची आहे. त्यांनाच हे वेळापत्रक तयार करायचं होतं. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. PAK vs AFG: क्रिकेट फॅन्समध्ये जोरदार मारामारी, लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवले! पाहा VIDEO टीम इंडियाचा पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सनं पराभव झाला होता. पाकिस्ताननं सलग तीन मॅच जिंकून ग्रुप 2 मध्ये टॉपवर आहे. तर अफगाणिस्तानची टीम 2 पैकी 1 मॅच जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. या परिस्थितीमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लढत 'करो वा मरो' स्वरुपाची आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, T20 world cup, Team india