मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: मुंबईत पाऊस नसूनही टेस्ट मॅचचा टॉस का लांबला? अंपायरनं सांगितलं कारण

IND vs NZ: मुंबईत पाऊस नसूनही टेस्ट मॅचचा टॉस का लांबला? अंपायरनं सांगितलं कारण

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या निर्णायक टेस्टकडे सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. या सर्व फॅन्सना शुक्रवारी सकाळी निराशा सहन करावी लागली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या निर्णायक टेस्टकडे सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. या सर्व फॅन्सना शुक्रवारी सकाळी निराशा सहन करावी लागली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या निर्णायक टेस्टकडे सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. या सर्व फॅन्सना शुक्रवारी सकाळी निराशा सहन करावी लागली.

मुंबई, 3 डिसेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या निर्णायक टेस्टकडे सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. या सर्व फॅन्सना शुक्रवारी सकाळी निराशा सहन करावी लागली. मुंबई टेस्टचा टॉस दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे पहिल्या दिवशी तब्बल अडीच तासांचा खेळ वाया गेला आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळी पाऊस नव्हता, पण तरीही टॉसला उशीर का झाला? असा प्रश्न फॅन्सना पडला आहे. या मॅचमधील अंपायरनी त्याचे कारण सांगितले आहे.

मुंबईत गेली दोन दिवस जोरदार पाऊस झाला. दोन्ही टीमच्या प्रॅक्टीसवरही याचा परिणाम झाला. त्यांना बुधवारी प्रॅक्टीस रद्द करावी लागली. वानखेडे स्टेडियमचं पिच कव्हरनं झाकलं आहे. त्यामुळे पिचचे या पावसामुळे फार नुकसान झाले नाही. मात्र आऊटफिल्ड ओले होते, त्यामुळे टॉस लांबणीवर पडला, अशी माहिती या मॅचचे अंपायर अनिल चौधरी यांनी 'स्टार स्पोर्ट्स' शी बोलताना दिली.  'बॉलर रन-अप घेतो ती जागा तसेच पिचच्या जवळील भाग हा आमच्यासाठी काळजीचा विषय होता. तो भाग कोरडा होणे आवश्यक आहे', असे चौधरी यांनी सांगितले.

तर, 'शुक्रवारी सकाळी वानखेडेवरील परिस्थिती टेस्ट मॅच खेळण्यासाठी 100 टक्के योग्य नव्हती. खेळाडूंची सुरक्षा हे आमचं मुख्य प्राधान्य आहे, त्यामुळे टॉस उशीरा घेण्याचा निर्णय घ्यावा लागला,' असे अंपायर नितिन मेनन यांनी स्पष्ट केले आहे.

IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील वाटचालीसाठी मुंबई टेस्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. कानपूर टेस्टमध्ये शेवटची विकेट घेण्यात अपयश आल्यानं टीम इंडियाला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारतीय टीमला 8 पॉईंट्सचा फटका बसला आहे. भारतीय टीम 2013 पासून मायदेशात एकही टेस्ट सीरिज हरलेली नाही. हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. तर न्यूझीलंडला 66 वर्षांमध्ये भारतात एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.  हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न पाहुणी टीम करणार आहे.

First published:

Tags: Cricket, Mumbai, Team india