- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
या 4 राशीचे लोक असतात सरळ स्वभावाचे; सोबतच्या व्यक्तीला कधीच नाही देत धोका

काही विशिष्ट राशीचे लोक त्यांच्या आयुष्यभर सहवासात असलेल्या इतर लोकांशी खूप निष्ठावान असतात आणि कधीही फसवणूक करत नाहीत. तसेच फसवणूक करणारे लोक त्यांना अजिबात आवडत नाहीत.
- News18 Lokmat
- Last Updated: Jul 30, 2022 08:39 PM IST
मुंबई, 31 जुलै : प्रत्येक व्यक्तीच्या राशीचा प्रभाव त्याच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांच्या स्थितीनुसार असतो. प्रत्येक राशीची स्वतःची खास वैशिष्ट्ये असतात. यापैकी काही राशी त्यांच्या निष्ठेसाठी देखील ओळखल्या जातात. असे मानले जाते की, काही विशिष्ट राशीचे लोक त्यांच्या आयुष्यभर सहवासात असलेल्या इतर लोकांशी खूप निष्ठावान असतात आणि कधीही फसवणूक करत नाहीत.
अशा काही राशी आहेत ज्या फसवणूक करणार्यांना दुसरी संधी देतात, परंतु या 4 राशीचे लोक स्वतःची फसवणूक करत नाहीत आणि फसवणूक करणार्यांना माफ देखील करत नाहीत. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा त्यांच्याबद्दल सांगत आहेत.
या राशी कोणत्या आहेत?
कुंभ
ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की कुंभ राशीचे लोक खूप निष्ठावान असतात. ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. ते त्यांना आयुष्यात कधीच फसवत नाहीत आणि फसवणूक करणाऱ्यांना ते कधीच माफ करत नाहीत. या राशीचे लोक थोडे रिझर्व स्वभावाचे असतात. काही गोष्टी ते स्वत:कडे राखून ठेवतात. ते आपले मन कोणाकडे व्यक्त करत नाहीत. या राशीचे लोक फसवणूक झाल्यावर तो अनुभव म्हणून घेतात. जेणेकरून भविष्यात त्यांची कोणाकडून फसवणूक होणार नाही.
मकर
मकर राशीचे लोक त्यांच्यासोबत झालेली फसवणूक कधीच विसरत नाहीत. यावर मात करण्यासाठी या राशीचे लोक स्वतःला अनेक कामांमध्ये अडकवून ठेवतात. या राशीचे लोक थोडे भोळे असतात आणि ज्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली आहे त्या व्यक्तीने त्याबद्दल त्यांची जाहीर माफी मागावी, अशी त्यांची इच्छा असते.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक मनाने शुद्ध आणि अतिशय भोळे असतात. या राशीचे लोक छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतात. म्हणून, जर एखाद्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली, तर ते त्यांना आयुष्यात कधीही माफ करू शकत नाहीत आणि त्या व्यक्तीचा बदला घेण्याचा विचार करत राहतात. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते त्यांच्याशी केलेल्या फसवणुकीचा बदला घेतात.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
वृषभ
ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, वृषभ राशीचे लोक कोणत्याही गोष्टीवर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर लवकर विश्वास ठेवत नाहीत. याशिवाय ते आपल्या भावना कोणाशीही सहजासहजी शेअर करत नाहीत. अशा परिस्थितीत जर त्यांचा एखाद्यावर विश्वास असेल आणि त्या व्यक्तीने त्यांचा विश्वास तोडला तर ते त्याला कधीही माफ करू शकत नाहीत. या राशीचे लोक आपल्यासोबत केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)