मराठी बातम्या /बातम्या /religion /Chanakya Niti: या गोष्टींवर ताबा नसेल तर मिळवलेली संपत्तीही गमवाल; होईल लक्ष्मीची अवकृपा

Chanakya Niti: या गोष्टींवर ताबा नसेल तर मिळवलेली संपत्तीही गमवाल; होईल लक्ष्मीची अवकृपा

चाणक्य नीती टिप्स

चाणक्य नीती टिप्स

आचार्य चाणक्य यांच्या नीति कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी : चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य यांच्या नीति कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं.

त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत.

सकाळी लवकर उठा

आचार्य चाणक्य सांगतात की सकाळची वेळ बहुमुल्य असते. त्यामुळे प्रत्येत व्यक्तीने लवकर उठावं. ज्यांना वेळेच महत्त्व कळत नाही असे लोक लवकर उठत नाहीत अणि उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडतात. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नाही. असे लोक नेहमी दरिद्री राहता.

स्वच्छता

शरीराच्या स्वच्छतेबरोबर दात आणि कपड्यांची साफसफाई करणं देखील खूप महत्वाचं आहे. जे नियमितपणे आंघोळ करत नाहीत,दात स्वच्छ करत नाहीत आणि अस्वच्छ कपडे घालतात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. अशा लोकांचं आयुष्य आजारपणात जातं. त्यांतच त्यांचे बरेच पैसे वाया जातात.

वेळेवर जेवण

चाणक्य यांनी जेवणाला खूप महत्वाचं मानलं आहे. सुदृढ शरीरासाठी प्रत्येकाने वेळेवर जेवण करावं असं ते म्हणतात. जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे, पण खाण्यासाठी जगू नका असंही ते सांगतात. ज्या लोकांचं मन फक्त खाणं आणि पैसे यात गुंतलेलं असतं त्यांच्या घरात पैसा टिकू शकत नाही.

हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ

गोड शब्द

आचार्यंच्यामते जगातील सगळी मोठी कामं गोड शब्दांनी होतात. गोड बोलणारे लोक सर्वांना प्रिय असतात. त्यांना सगळीकेड आदर मिळतो, संधी उपलब्ध होतात. त्याउलट कडू बोलणारे कोणालाच आवडत नाहीत. त्यांचे संबंध चांगले राहत नाहीत. लक्ष्मी यांच्या जवळ कधीच थांबत नाही.

First published:

Tags: Acharya chanakya, Chanakya niti