मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News: दुर्दैवी! मोटर चालू करताना विजेचा झटका, धक्क्यामुळे विहरीत कोसळून मृत्यू

Pune News: दुर्दैवी! मोटर चालू करताना विजेचा झटका, धक्क्यामुळे विहरीत कोसळून मृत्यू

जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले आहे

जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले आहे

जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले आहे

पुढे वाचा ...

पुणे, 29 एप्रिल: जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले आहे.

सुरेश सखाराम घाडगे (वय 40) विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता विजेचा झटका बसला. विजेचा जोराचा धक्का बसल्याने ते थेट शेजारीच असलेल्या विहिरीत कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने वैद्य वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. आई-वडील वृद्ध असल्यामुळे रोज सकाळी मोटर सुरू करण्यासाठी ते स्वत: जात असत. परंतु, आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे.

वैद वस्ती परिसरात निम्म्या घरांना ग्रामपंचायत नारायणगावचा पाणीपुरवठा होत नाही. आम्ही ग्रामपंचायत नारायणगावला या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली संपर्क केला. परंतु, त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली आहे, असा आरोप वैद वस्ती ग्रामस्थांनी केला आहे.

हे वाचा - COVID-19 in India: 24 तासात 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा पुन्हा 3000 पेक्षा जास्त

या संपूर्ण घटनेला ग्रामपंचायत नारायणगाव आणि सदस्य जबाबदार आहेत, अशी स्पष्ट टीका ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तर या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य सारिका डेरे यांच्याशी संपर्क केला असता सदर ग्रामस्थांकडून माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही आणि त्यांनी मला कुठलाही अर्ज दिला नाही, असे सांगून ग्रामस्थांचे आरोप फेटाळले आहेत.

एकंदरच या संपूर्ण विषयात ग्रामपंचायत पाणीपुरवठा करत नसल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे, असा ग्रामस्थांचा स्पष्ट आरोप आहे.

First published:

Tags: Pune, Pune accident, Pune news