मळदगाव इथे पोहोचल्यावर तर संपूर्ण पूलचं खचलेला होता. त्यामुळे फडणवीस यांना पुलाच्या अलीकडेच थांबावे लागले होते. तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला गावकरी थांबले होते. यावेळी ओढाच्या पलीकडे असलेल्या लोकांशी फडणवीसांनी मोठ्याने बोलून संवाद साधला आहे.मळद गावातील ही एक वस्ती. (दौंड तालुका) पूल वाहून गेला, त्यामुळे गावाशी संपर्क तुटला. शेतीचे नुकसान जनावरं वाहून गेली... ८ दिवसांपासून वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, कुणी आजारी पडले तर दवाखान्यात जायला रस्ता नाही. माझी सरकारला विनंती आहे की याची तत्काळ दखल घ्यावी! pic.twitter.com/1pUxLFWGhw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 19, 2020
केंद्र सरकार हे मदत करणारच आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. पण, राज्य सरकारने हात झटकले नाही पाहिजे. राज्य सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदत घोषित केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे आणि सोलापूरचा दौरा केला. विशेष म्हणजे, बारामतीपासून सुरुवात करुन कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परांडा या ठिकाणी पाहणी करुन उस्मानाबादकडे रवाना होणार आहे. त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सोबत आहे.ही राजकारणाची वेळ नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल? माध्यमांशी साधलेला संवाद... pic.twitter.com/rkNjTUWe5y
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.