अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या नव्या पुस्तकातून भारतीय राजकारणातील मुद्द्यांमुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. आपल्या नव्या पुस्तकात अबोमा यांनी असा दावा केला आहे की 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. याच्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले. (फोटो- AFP)
ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांना (मनमोहन यांना) भीती होती की देशातील विरोधक भाजप मुस्लिमविरोधी भावना वाढवत आहेत. त्याचबरोबर ओबामा यांनी असेही म्हटले आहे की राजकीय पक्षांमधील कडवे वाद, विविध सशस्त्र फुटीरवादी चळवळी आणि भ्रष्टाचार घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी अनेक प्रकारे यशस्वी म्हणता येईल. (फोटो- AFP)
ओबामांनी राहुल हे चिंताग्रस्त आणि स्वत:बाबत अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधींची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे जो शिक्षकांनाही प्रभावित करतो मात्र या विषयात प्राविण्य मिळवण्याची त्याच्याकडे योग्यता नाही आहे किंवा आवड नाही आहे. (फोटो- AFP)