विराटच्या घरी नाही एकही नोकर, अनुष्का आणि विराट कसं करतात घरकाम?
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरील आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा अहंकारी मनुष्य म्हणून ओळखला जातो. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या वागण्याविषयी काही खुलासे केले आहेत.


1) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरील आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा अहंकारी मनुष्य म्हणून ओळखला जातो. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या वागण्याविषयी काही खुलासे केले आहेत. सरनदीप सिंग म्हणाले, की या कपलच्या मुंबईतील घरात एकही नोकर नाही.


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पाहुण्यांच्या करत असलेल्या सेवेसाठी सरनदीप यांनी दोघांचंही कौतुक केलं आहे. त्यांनी सांगितलं, की विराट आणि अनुष्का स्वतःच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या ताटात जेवण वाढतात. त्यांनी सांगितलं, की विराट नेहमीच आउटिंग, गप्पा आणि क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी तयार असतो. तुम्ही विराटसारख्या व्यक्तीकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करू शकता.


सरनदीप सिंग यांनी स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की विराट आणि अनुष्काच्या घरी एकही नोकर नाही. विराट आणि अनुष्का स्वतःच सगळ्यांना जेवण देतात. तुम्ही अजून काय अपेक्षा करू शकता? विराट नेहमी आपल्याजवळ बसतो. आपल्यासोबत बातचीत करतो, गप्पा मारतो. तो आपल्यासोबत डिनरसाठी बाहेरही येतो. सगळे खेळाडू त्याचा खूप आदर करतात. तो डाउन टू अर्थ आणि मजबूत इच्छाशक्ती असणारा व्यक्ती असल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे.


सरनदीप सिंग पुढे म्हणाले, की खेळाच्या मैदानावरील काही गोष्टींवरुन लोकांनी विराटबद्दल आपलं मत बनवणं चुकीचं आहे. कारण त्यावेळी विराट संपूर्ण भारतीय संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उभा असतो. अशात त्याचं आक्रमक होणं सहाजिक आहे, मात्र मैदानाबाहेर तो अतिशय शांत व्यक्ती आहे.