अजित आगरकर- फार कमी लोकांना माहीत आहे की, आचरेकरांनी अजितलाही क्रिकेटचे धडे दिले आहेत. अजितने २०० सामन्यांहून जास्त सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघात तो तेज गोलंदाजी करायचा. आतापर्यंत त्याने २६ कसोटी सामन्यात, १९१ एकदिवसीय सामन्यात आणि ४ टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
विनोद कांबळी- हे नाव लोकांना नवं नाही. विनोद आणि सचिनच्या जोडीने रमाकांत आचरेकरांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. या जोडगोळीमुळे त्यांची अनन्यसाधारण कामगिरी लोकांच्या समोर आली. विनोदने भारताचे लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून प्रतिनिधित्व केले. त्याने भारतासाठी १७ कसोटी सामने आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले.